Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन विधानपरिषद निवडणुकीनंतर होण्याची शक्यता

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन विधानपरिषद निवडणुकीनंतर होण्याची शक्यता



मुंबई : खरा पंचनामा

विधिमंडळाचे १० जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक संपल्यानंतर म्हणजे जुलैमध्ये हे अधिवेशन होण्याची शक्यता असून, अंतिम निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी येणार आहे, त्यानंतर दोन दिवसात नवी लोकसभा स्थापन झाल्यानंतर लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात येईल.

राज्यात विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या या भागात आचारसंहिता कायम राहणार असल्याने अधिवेशन पुढे ढकलण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.