Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्मवीर पतसंस्थेने सभासदांची पत निर्माण केलीप. पू. अद्दश्य काडसिध्देश्वर स्वामीजी : नागांव शाखेचे प्रशस्त आधुनिक कार्यालयात स्थलांतर

कर्मवीर पतसंस्थेने सभासदांची पत निर्माण केली
प. पू. अद्दश्य काडसिध्देश्वर स्वामीजी : नागांव शाखेचे प्रशस्त आधुनिक कार्यालयात स्थलांतर

सांगली : खरा पंचनामा

ज्या ठिकाणी सामान्य माणसाला आडचणीच्या वेळी कोणीही मदत करीत नाही. त्या ठिकाणी पतसंस्थानी मात्र सभासदांना मोठा आर्थिक आधार दिला आहे. वेळ काळ न बघता पतसंस्था सामान्य सभासदांच्या आडचनीला उभ्या राहिल्या आहेत. त्यामध्ये कर्मवीर पतसंस्था सांगली यांनी देखील सभासदांच्या आर्थिक उन्नतीमध्ये मोठे योगदान दिले आहे व सभासदांचे आर्थिक हित साध्य केले आहे अशी भावना प. पू. अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केली. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगलीच्या नागांव (ता. हातकणंगले) येथील शाखेचे प्रशस्त वास्तुत स्थलांतरण प. पू. अद्दश्य काडसिध्देश्वर स्वामीजी, मठ संस्थान कणेरी मठ यांचे अमृतहस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेचे पुजन झाले.
स्वागत आणि प्रास्ताविक कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. संस्था सभासदांच्या उन्नतीसाठी राबवित असलेल्या सर्व सेवांची माहीत त्यांनी दिली. त्यांच्या हस्ते स्वामीजीना वस्त्र प्रदान करणेत आले व त्यांचे स्वागत करण्यात आले. संस्था ६४ शाखा मधून सभासदांना विनम्र सेवा पुरवित आहे. ६८००० सभासदांच्या माध्यमातून संस्थेच्या ठेवी रु. १२४५ कोटी असून रु.९५३ कोटीचे कर्ज वितरण केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
सहकार ही फार मोठी चळवळ असून तिने जनतेच्या सुधारणेची मोठी जबाबदारी उचलेलेली आहे. त्यामध्ये कर्मवीर पतसंस्थे सारख्या अनेक संस्थाचे योगदान आहे. पतसंस्था वेळ काळ न पाहता गरजुंच्या मदतीला उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे सभासदांनी देखील त्यांची कर्ज वेळेत भरली पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. निती नियमांच्या चौकटीत राहुन माणसाला मोठे कार्य करणे शक्य आहे. पैसा हा अनिवार्य पण साध्य नाही. पैशाचा उपयोग माणसाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे. पैशा चलन म्हणुन काम करतो त्यातून सर्वांची प्रगती साध्य होते. सर्व भेदभाव बाजूला ठेवून माणसाने माणसाच्या मदतीला पुढे आले पाहिजे व सर्वाना सोबत पुढे नेले पाहिजे असे मत स्वामीजीनी व्यक्त केले. यावेळी भजनी मंडळाने स्वामीजींचे सवाद्य स्वागत केले.

कार्यक्रमास नागांव गावच्या सरपंच विमल अनिल शिंदे, उपसरपंच सुधीर सुभाष पाटील, सुभाष पुरंदर पाटील, महावीर जगोंडा पाटील, उत्तम गुंडा सावंत, गणपती मारुती माळी, शिवाजी पोवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांचे संस्थेच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शाखाधिकारी प्रविण पाचोरे, विभागीय अधिकारी अभिजीत खोत व इंटेरिअर डेकोरेटर अक्षय पाटील याना स्वामीजीनी आशिर्वाद दिले.

या कार्यक्रमास संस्थेचे संचालक अॅड. एस. पी. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू, डॉ. एस.बी. पाटील (मोटके) तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, लालासो भाऊसाो थोटे, वसंतराव धुळाप्पाण्णा नवले. डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, श्री. ए. के. चौगुले (नाना), संचालिका भारती आप्पासाहेब चोपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह सभासद, सेवक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक सकळे यांनी मानले. सुत्रसंचलन संजय सासणे यांनी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.