Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांना सर्वोच्च झटका !

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांना सर्वोच्च झटका !

नवी दिल्ली : खरा पंचनामा

परभणी न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश कायम ठेवत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांवर लवकरच कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

१० डिसेंबर २०२४ रोजी परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर राज्यभर आंबेडकरी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. या पार्श्वभूमीवर परभणीत बंद पुकारण्यात आला होता, ज्याला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधूर आणि अटकसत्र सुरू केले. त्याच दरम्यान लातूरचा मूळ रहिवासी आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि न्यायालयीन कोठडीत पाठवले. मात्र अवघ्या दोन दिवसांत त्याचा मृत्यू झाला.

सोमनाथच्या आई विजयबाई वेंकट सूर्यवंशी यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथची बाजू घेऊन न्यायालयात ठोस पवित्रा मांडला होता. परिणामी, हायकोर्टाने पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, पोलीस विभागाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर अंतिम सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.