Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अखेर त्या पोलिसावर गुन्हा दाखल; दुसऱ्याची जमीन विकण्याचा प्रयत्न, 12 जणांचा समावेश

अखेर त्या पोलिसावर गुन्हा दाखल; दुसऱ्याची जमीन विकण्याचा प्रयत्न, 12 जणांचा समावेश



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील रसुलवाडी येथील जमीन विक्री करायची असल्याचे सांगून 31 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका पोलिसासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसासह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील संशयित पोलिस एका नेत्याचा अंगरक्षक म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात आले. यातील पोलिसासह तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

याप्रकरणी विनायक रामचंद्र सुतार (रा. वासुंबे ता. तासगाव), पोलिस शिपाई कृष्णदेव रामचंद्र पाटील, (वय ३५), अरविंद पाटील (वय ३५, रा. बलवडे, ता. तासगाव), सुधीर शिंगाटे, अनोळखी 8 जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जयदेव काळे (रा. जायगव्हान, ता. कवठेमहांकाळ) यांनी फिर्याद दिली आहे.

काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सर्व संशयितांनी संगणमत करून जानेवारी २०१८ मध्ये विनायक सुतार, अरविंद पाटील, कृष्णदेव पाटील, सुधीर शिंगटे ऊर्फ मेवा पाटील या एजेंट लोकांनी कवलालापुर गावचे हदीत तासगाव फाटा ते कवलापुर जाणारे रोड वर असले रसुलवाडी रोड स्मशान भुमी च्या उत्तरेकडील ८ एकर १६ गुंठे शेत जमीन ही विक्रीस निघाली आहे असे सांगितले. ती जमीन त्यांनी पाहीली आहे. ती जमीन चांगली आहे आपल्या दोघांत ती जमीन घेवु असे सांगुन त्यांनी मला ती जमीन दाखवली होती. ती जमीन मला पसंत पडली म्हणुन मी विजय चव्हाण यांना शेत जमीनीचा दोघांमध्ये व्यवहार करु असे म्हणून जमीन मालकांना समोर बोलावुन घेणेस सांगितले होते.

त्याप्रमाणे विनायक सुतार, अरविंद पाटील, कृष्णदेव पाटील, शिंगटे ऊर्फ पाटील यांनी जमीनीचे करारपत्रवर फोटो असलेल बनावट अमित मनोहर मुळे, अभिजित मनोहर मुळे, अशालता मनोहर मुळे, जीवंधर भुपाल मुळे, सुकुमार भुपाल मुळे, उत्तम भुपाल मुळे, गुंधर श्रीपाल मुळे, चंद्रकांत श्रीपाल मुळे हे लोक मुळ मालक नाहीत हे माहीत असुन देखील विनायक सुतार, अरविंद पाटील, कृष्णदेव पाटील व सुधीर शिंगटे ऊर्फ भैया पाटील या सर्वांनी आम्हाला फसवण्याच्या उद्देशाने तेच त्या जमीनीचे मुळ मालक आहेत असे आम्हाला ओळख करुन देवून त्यांना व्यवहारासाठी समोर आणले.

जमीनीची १ कोटी २० लाख रुपये रक्कम त्यांचे करवी आम्हास सांगुन त्यांची वरील ८ लोकांची बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्र तयार करुन व्यवहाराची खोटी करण्यात आलेल्या करार पत्रास ती जोडुन त्यावर त्यांना सहया करणेस सांगुन हजर असलेले लोकच जमीनीचे मुळ मालक आहेत असे आम्हाला भासवले. ठरवलेल्या जमीनीचे व्यवहारासाठी इसारत म्हणुन १ लाख रुपये रोख व ७/१२ वरील बँकेचा बोझा कमी करणे याठी म्हणुन दि २४.१.२०१८ रोजी माझे व विजय चव्हाण कडुन रोख २४ लाख रुपये व चेकने ६ लाख रुपये असे एकुण ३१ लाख रुपये विजय चव्हाण यांचे सावळी येथील ऑफीस मध्ये घेवारे वकील व रमेश चौगुले आणी माझी पत्नी सौ सिंदु जयदेव काळे यांचे समक्ष घेवुन ठरलेला व्यवहार चार महीन्याच्या मुदतीत पुर्ण करुन देतो असे आम्हास खोटे सांगितले.

त्यांनंतर आमचा त्यांचे वर विश्वास बसावा म्हणुन आरविंद पाटील व भैया पाटील या दोघांनी विराचार्य बाबासाहेब कुचनुरे या पतसंस्थेचा व्यवहारातील जमीनीचे ७/१२ वरील कर्ज निल केल्याचा खोटा व बनावट दाखल तयार करुन दाखवला होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

माझी फसवणुक झाले नंतर मी वेळोवेळी आरोपींना माझी फसवणुकीची रक्कम परत मागितली असता ते वेळोवेळी रक्कम परत देवु असे आश्वासन देत होते. त्यामुळे पैसे परत मिळतील या आशेवर मी आज रोजी पर्यत तक्रार दिली नव्हती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.