Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राहुल गांधी कायद्यापेक्षा मोठे नाहीत : रामदास आठवले

राहुल गांधी कायद्यापेक्षा मोठे नाहीत : रामदास आठवले



सांगली : खरा पंचनामा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य आहे. राहुल गांधी कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तसेच राहुल गांधी यांच्यावरील कारवाई मध्ये भाजपाचा संबंध नसून राहुल गांधींनी याआधी अनेक वेळा चुकीचे वक्तव्य केले आहेत, एकदा त्यांना माफी देखील मागावी लागली आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी आपले तोंड सांभाळून बोलले पाहिजे. 

तसेच मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसचा फायदा होत नाही आणि पक्ष वाढत नाही, असा टोला देखील लगावला आहे.  आठवले रविवारी सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

आठवले म्हणाले, शरद पवारांना आता एनडीए सोबत यावे. नागालँड प्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीएसोबत यावे असे निमंत्रण देत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध असून मोदींच्याकडून पवारांचें अनेक वेळा कौतुक झाले आहे. शरद पवारांनी कितीही विरोधी पक्षाला एकत्र करून आघाडीच्या बैठका घेतल्या. तरी 2024 मध्ये पुन्हा एनडीएचे सत्ता येणार आहे, असेही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.

यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांचावरही मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. मुंबईचा मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस विकास करत असताना त्याला डान्सबार म्हणणं चुकीचं आहे, तसेच राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये, भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील ते बघावे. भोंग्याना विरोध करू नये. राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा असा टोला देखील लगावला. 

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दोन जागा मिळाव्यात, अशी आपली मागणी राहणार आहे. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा देखील करणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.