Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिंदे सरकारला धक्का!

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिंदे सरकारला धक्का!



मुंबई : खरा पंचनामा 

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या बदलीसंदर्भात निवडणूक आयोगाने राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे सरकारला दणका दिला आहे.

चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना 3 वर्षांच्या निकष लावू नये अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती. ही याचिका आयोगाने मंगळवारी फेटाळली. त्यामुळेच चहल यांची बदल अटळ असल्याचं स्पष्ट झालं आहे.

चहल यांच्याबरोबरच अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आता शिंदे सरकारला करावाच लागणार आहे. निवडणूक आयोगाने मागील आठवड्यांमध्येच, '3 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या कराव्यात,' असा आदेश दिला होता. या आदेशामुळे मुंबईमध्ये चहल यांच्याबरोबरच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्याच लागणार आहेत. थेट निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग नसल्याने आयुक्त तसेच उपायुक्तांना आदेशातून वगळावे, अशी विनंती राज्य सरकारने केली होती. असं एक पत्रच मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने निवडणूक आयोगाला पाठवलं होतं. मात्र मंगळवारी निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महानगरपालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांची बदली करावीच लागेल, असं निवडणूक आयोगाने राज्य सरकारला सांगितलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता राज्य सरकारला चहल, भिडे यांच्याबरोबरच वेलासारू, पुणे येथील आयुक्तांसहीत अधिकाऱ्यांची बदली करावीच लागणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.