Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणूक आयोगाच्या नव्या सूचनांनुसार बदल्या नाहीत? राज्यातील काही जागा रिक्तच, आचारसंहितेपूर्वी बदल्या होणार का?

निवडणूक आयोगाच्या नव्या सूचनांनुसार बदल्या नाहीत?
राज्यातील काही जागा रिक्तच, आचारसंहितेपूर्वी बदल्या होणार का?



मुंबई ः खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने बदल्यांच्या नियमांत सुधारणा केल्यानंतरही अनेक विभागातील बदल्या करण्यात आल्या. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्या आयोगाच्या पूर्वीच्या सूचनांप्रमाणेच करण्यात आल्या आहेत. सुधारित आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या नसल्याची या विभागात चर्चा आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सीमाभागातील तसेच राज्यातील काही पदे रिक्तच असल्याचे सांगितले जात आहे.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी या सूचनांमध्ये बदल करण्यात आले. बदल केलेल्या सूचनांनुसार बहुतांशी शासकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या नव्याने बदल्या करण्यात आल्या. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्या नव्या सूचनांनुसार करण्यात आल्या नसल्याची चर्चा आहे. तीन वर्षे एकाच जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची तसेच मूळ जिल्हा असलेल्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण झाली असली तरी अकार्यकारी पदावर पूर्वीपासून कार्यरत असणाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे नव्या सूचनांमध्ये म्हटले आहे. शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच अकार्यकारी पदावर हजर झालेल्यांच्या बदल्या करण्याच्या सूचनाही नव्या आदेशात दिल्या आहेत.  

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आयोगाच्या पूर्वीच्या सूचनांनुसार करण्यात आल्या. मात्र नव्या सूचनांनुसार बदल्या करण्यात आल्या नसल्याची चर्चा याच विभागातील अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी नव्या सूचनांनुसार बदल्या होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सीमाभागातील पद रिक्त
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. चोरटी दारू, पैसे वाहतूक रोखण्यासाठी ही खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. मात्र कोल्हापूर विभागीय उपआयुक्तांच्या भरारी पथकासाठी अद्याप एकाही अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. शिवाय राज्यातील काही पदेही रिक्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही पदे भरणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.