'महाराष्ट्र केसरी'त मोठा राडा!
शिवराज राक्षेकडून मारहाण; पंचांना लाथ घातली
परभणी : खरा पंचनामा
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम थरार आज पार पडत असून या स्पर्धेत मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तसेच माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात लढत झाली.
यावेळी शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झालेल्या लढतीनंतर हा राडा झाला. पैलवान शिवराज राक्षेने पराभवानतंर आक्षेप घेत थेट पंचाना मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. यावेळी मैदानावर मोठा गोंधळ झाला आहे. यावेळी शिवराज राक्षेने आक्रमक होत पंचाना लाथ घातली. पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप कर त्याने गोंधळ घातल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी शिवराज राक्षे याने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही चर्चा केली. आपल्यावर अन्याय झाला असून पंचांनी निर्णय चुकीचा दिल्याचे त्याने म्हटले आहे. याच रागातून त्याने पंचांशी हुज्जत घातली आणि त्यांना मारहाणही केली. ज्याचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या गोंधळानंतर अंतिम सामने खोळंबल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आता महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध साकेत यादव यांच्यामध्ये लढत होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.