मोठ्या पोलिस बंदोबस्तात किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात
कोल्हापूर : खरा पंचनामा
किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. आज पहाटेपासूनच ही कारवाई सुरु करण्यात आलीये. जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण केलेल्या भागांवर ही कारवाई सुरू आहे.
31 मे'पूर्वी गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण मुक्त करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. ती मुदत आता संपली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणांबाबत जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी आढावा घेण्यात आला होता.
कोल्हापूर पोलिसांनी किल्ले विशाळगडावरील पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, अतिक्रमण केल्यांपैकी 64 जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामध्ये 14 अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, पुन्हा पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर अतिक्रमणधारक सहकार्य करत अतिक्रमण काढण्यास मदत करत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याबाबतची माहितीही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.