लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या 'सरकारी नोकरदार' महिला रडारवर
बावनकुळेंनी दिला कारवाईचा दणका!
नागपूर : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना त्याचा लाभ देण्यात आला होता. महायुतीचे सरकार पुन्हा स्थानापन्न झाल्यानंतर या योजनेची शहानिशा करण्याचे ठरवण्यात आले. सुरुवातीला सरकारने कोणावर कारवाई करणार नाही, थकबाकी वसूल करणार नाही असे जाहीर केले होते.
आता मात्र सरकारी नोकरीत असणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून वसूली केली जात आहे. शासकीय नोकरदार महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला.
बावनकुळे म्हणाले, दीड हजार रुपये महिन्यासाठी सरकारी सेवेत असलेल्या महिलांनी असे करायला नको होते. कोणी लाभघेतला असले तर तो परत करायला हवा. शासनामार्फत वसुली केली जाणारच आहे. काही खात्यांनी याची चौकशी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजना गोरगरीब बेरोजगार महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.
यानंतरही शासकीय कर्मचारी याचा लाभ घेणार असले तर कारवाई निश्चित आहे असेही बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीचे निकष तीन हेक्टरवरून दोन हेक्टर करण्यात आल्याने महायुती सरकारवर आरोप केले जात आहे. निवडणुकीत फयदा घेण्यासाठी तीन हेक्टरची घोषणा केली होती काय अशी विचारणा केली जात आहे.
यावर चंद्रकांत बावनकुळे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाचे निकषात समानता यावी. अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगून आपली सुटका करून घेतली. अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसान भरपाई करिता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिला विषय हाच राहणार असल्याचे सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.