अजितदादांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ, कार्यकर्ते आक्रमक; थेट पोलिसांना बोलावले
पुणे : खरा पंचनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यातील गणेश कला या सभागृहात कार्यक्रम सुरू असताना मोठा गोंधळ झाला. काही कार्यकर्ते पुढे आले त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. कर्जमाफीसाठी आंदोलन करत असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या समर्थनाअर्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढले. महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या.
कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडूंना काल भेटले. त्यांनी त्यांच्याशी चर्चा करून दिली. तसेच मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला. मुख्यमंत्र्यांनी फोनवरून सांगितले की, तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात समिती स्थापन करू. या समितीमध्ये बच्चू कडू तुम्हालाही घेतो. ती समिती अहवाल देईल. त्याची कॅबिनेटमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ.
अजित पवार हे बोलत असतानाच कार्यकर्त्यांनी पुन्हा जोरदार गोंधळ घातला. त्यावेळी त्यांनी पोलिसांना सांगितले की, यांना बाजुला घेऊन जा. माझे सांगून झाले आहे. अशा पद्धतीने चर्चा होत नाही. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना सभागृहाच्या बाहेर नेले.
सभागृहाच्या बाहेर जमलेल्या महिला कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बच्चूभाऊंचा जीव गेल्यानंतर निर्णय घेणार का? मतदान मागतेवेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती मग आत्ता अंमलबजावणी का करत नाही? असा सवाल आंदोलकांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.