अवघ्या तासाभरात होतेय श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन
व्हीआयपी दर्शन बंदचा परिणाम
पंढरपूर : खरा पंचनामा
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंदी बरोबरच इतर काही उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १२) दर्शन रांगेतील भाविकांना अवघ्या तासाभरात देवाचे पदस्पर्श दर्शन मिळाले. लवकर दर्शन मिळाल्याने भाविकांनी व्हीआयपी दर्शन बंदीचे स्वागत केले.
श्री विठ्ठल दर्शनासाठी राज्यभरातून दररोज हजारो भाविक पंढरपुरात येतात. आषाढी वारीच्या निमित्ताने तर भाविकांची संख्या अधिक वाढली आहे. दर्शन रांगेतून येणाऱ्या भाविकांचे जलद व सुलभपणे दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर दर्शन रांगेतून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी दर्शन बारीला जाळीचे गार्ड बसविले आहेत. ऑनलाइन दर्शन सुविधा देखील बंद केली आहे. त्याचा एकत्रित चांगला परिणाम दिसून येऊ लागला आहे. गुरुवारी दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांना अवघ्या एक तास ते दीड तासांमध्ये जलद व सुलभपणे दर्शन झाले. लवकर दर्शन होत असल्याने अनेक भाविकांनी मंदिर समितीच्या या निर्णयाचे स्वागतही केले.
या विषयी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले, भाविकांच्या दर्शनाला प्राधान्य दिले आहे. दर्शन रांगेतील भाविकांचे देवाचे पदस्पर्श जलद व सुलभ व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. शिवाय दर्शन बारीतील घुसखोरी रोखण्यासाठी जाळी गार्ड बसवले आहे. त्यामुळे भाविकांना आता अवघ्या तासाभरात दर्शन मिळत आहे. आषाढी यात्रेत देखील भाविकांना वेळेत दर्शन मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.