Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'..."

"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'..."

मुंबई : खरा पंचनामा

राज्य सरकारने त्रिभाषा सुत्रीकरणाच्या अनुषंगाने घेतलेल्या पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होताना दिसत आहे. राजकीय नेते आणि पक्षांनी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र विरोध करत पहिलीपासून हिंदी सक्ती नको असं म्हटलं आहे. अनेक सेलिब्रिटीही सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आहेत. आता मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंनी हिंदी भाषा सक्तीवरुन खरमरीत पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमधून त्यांनी सरकारला टोला लगावला आहे. "ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ....' यात पहिली ते चौथीच्या बाळांना कन्फ्युज करू नका... त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या" असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. "हिंदी सक्ती नकोच, जय महाराष्ट्र" असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

दरम्यान, केदार शिंदेंसोबतच अनेक कलाकारांनी पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याला विरोध केला आहे. मकरंद अनासपुरे, हेमंत ढोमे, सयाजी शिंदे, किरण माने या कलाकारांनी त्यांच्या भूमिका मांडत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक कलाकार हळूहळू पुढे येत त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.