NHAI वर दुचाकी वाहनांनाही द्यावा लागणार टोल
१५ जुलैपासून लागू होणार नियम
दिल्ली : खरा पंचनामा
राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी मोठी बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरही टोल भरावा लागणार आहे. हा नियम १५ जुलैपासून लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
नवीन नियमानुसार, दुचाकी वाहनांना FASTag द्वारे टोल भरावा लागणार असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना २००० रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी जेव्हा तुम्ही दुचाकी खरेदी करता तेव्हा त्या वेळी टोल कर घेतला जातो. त्यामुळे जेव्हा दुचाकी वाहने राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावरून जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल वसूल केला जात नव्हता. तर फक्त चारचाकी वाहनांसह मोठ्या वाहनांकडून टोल घेतला जात होता. परंतु, आता नव्या नियमानुसार येत्या 15 जुलैपासून NHAI वरून जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांनादेखील टोल भरावा लागणार आहे.
NHAI च्या टोल इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या नोंदीनुसार, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशात एकूण १०५७ एनएचएआय टोल आहेत. त्यापैकी सुमारे ७८ टोल एकट्या आंध्र प्रदेशात आहेत. बिहारमध्ये ३३ राष्ट्रीय महामार्ग टोल आहेत तर उत्तर प्रदेशात १२३ टोल प्लाझा आहेत.
यापूर्वी टोलच्या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 15 ऑगस्टपासून वाहनचालकांना फास्टटॅगचा वार्षिक पास बनवता येणार आहे. हा पास वार्षिक 3 हजार रूपयांचा असेल अशी मोठी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे.
१५ ऑगस्ट २०२५ पासून खाजगी वाहनांसाठी (जसे की कार, जीप, व्हॅन इ.) ३,००० रुपयांचा फास्टॅग (Fastag) आधारित वार्षिक पास जारी केला जाईल. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा २०० ट्रिपसाठी, जे आधी असेल ते वैध असेल. या पाससाठी लवकरच एक स्वतंत्र लिंक NHAI आणि MORTH च्या वेबसाइटवर आणि 'हायवे ट्रॅव्हल अॅप' वर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे पासचे सक्रियकरण आणि नूतनीकरण सोपे आणि सोयीस्कर होईल असे गडकरी यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.