Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"मतदार यादीतून नाव वगळणे दहशतवादापेक्षाही गंभीर आणि भयानक"

"मतदार यादीतून नाव वगळणे दहशतवादापेक्षाही गंभीर आणि भयानक"

पाटणा : खरा पंचनामा

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पाटण्यात झालेल्या लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतदार हक्क यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यात्रेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही सहभाग घेत इंडिया आघाडीला पाठिंबा दर्शविला.

स्टॅलिन यांनी भाषणात सांगितले की, "मतदार यादीतून नाव वगळणे हा प्रकार दहशतवादापेक्षाही गंभीर आणि भयानक आहे." त्यांनी पुढे म्हटले की, बिहारमध्ये तब्बल ६५ लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाली आहेत, जे लोकशाहीसाठी मोठा धोका आहे.

यावेळी खासदार प्रियंका गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनीही केंद्र सरकार, तसेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपने देशभरात आणि विविध राज्यांमध्ये मतचोरी करून सत्ता काबीज केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात केंद्रीय निवडणूक आयोगालाही जबाबदार धरले जात असल्याची चर्चा रंगली आहे.

स्टॅलिन म्हणाले, "जनतेच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. ही आघाडीच आम्हाला बिहार निवडणुकीत विजय मिळवून देईल. भाजपचे विश्वासघातकी राजकारण संपुष्टात येईल."

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.