Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार

शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार



हिंगोली : खरा पंचनामा 

रब्बी हंगामात पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी फरफट झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. थकीत वीज बिलासाठी वीज तोडू नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मात्र फडणवीस यांनी सूचना देऊन देखील माझी वीज तोडली. ते खोट बोलत असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर किंवा महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. अशी तक्रार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका शेतकऱ्याने दिली आहे.

दशरथ मुळे (रा. माझोड) असे तक्रार देणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. 21 नोव्हेंबर रोजी मध्यमांना दिलेल्या मुलाखीत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ज्या भागात अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशा भागात वीज पुरवठा खंडित करु नये व सक्तीची वीज बिल वसुली देखील करु नये, अशा सूचना त्यांनी महावितरण कंपनीला दिले होते. तरी देखील वीज वितरण कंपनीने शेताचा वीज पुरवठा खंडित केला. 

माझीच नाही तर इतर अनेक जणांची वीज कापली, असे मुळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.