Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीमाभागातील गावांच्या महाराष्ट्रात सामावेशासाठी ठराव मांडणार : अजित पवार

सीमाभागातील गावांच्या महाराष्ट्रात सामावेशासाठी ठराव मांडणार : अजित पवार



नागपूर : खरा पंचनामा

एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक-एक इंच जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे. याबद्दल विधीमंडळात ठराव मांडणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, कर्नाटकने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळेस सगळ्यांनी मागणी केली होती की आपले अधिवेशन सुरु असताना आपण सर्व जण मराठी भाषिकांच्या बाजूने आहोत. आणि ही सर्व जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे. एक-एक इंच जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे ही आमची व महाराष्ट्रवासियांची भूमिका आहे. आणि विधीमंडळामध्ये तशा प्रकारचा ठराव हा आणला जाणार आहे आणि तो एकमताने दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्याबद्दल विरोधी पक्ष पाठिंबा देणार आहे. यामुळे आपल्या येथेही हा ठराव केला जाणार आहे.

सातत्याने बोम्मई त्यांच्या भागातील नागरिकांना कर्नाटकवासियांना बरे वाटण्यसाठी तशी विधाने करत आहेत. आपल्याही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आक्रमक भाषा वापरली पाहिजे. त्याच्यातून महाराष्ट्रातील सीमावासिय मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला समाधान वाटेल. जशास तसे उत्तर दिले पाहिजे, असे पवार यांनी म्हंटले आहे.

सभागृहात मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना विचारुन ठराव घेणार असून या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे विधीमंडळ हे मराठी भाषिकांच्या बाजूने आहे हे त्या बाबतीत दाखवले जाईल. हा ठारव मांडणारच याची खात्री मी देतो. कर्नाटक जसे त्यांच्या भूमिकेला अडून राहीलेत. तशीच भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने घ्यावी. तसेच, एक-एक इंच जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे हेच मत राज्याच्या वतीने सरकारने सर्वोच्च न्यायालयातही मांडावे ही आमची त्यांना आग्रही मागणी आहे, असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.