Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जे पोटात होतं ते ओठावर आलं!

जे पोटात होतं ते ओठावर आलं! 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

गिरीश महाजन यांच्या बोलण्यावरून एक स्पष्ट झाले आहे, भारतीय जनता पक्षाचे शिवसेना तोडण्याचे जुनं स्वप्न होतं, शरद पवार यांचे स्वप्न नव्हतं. ते भारतीय जनता पार्टीचे होतं, त्यांच्या जे पोटात होतं ते ओठावर आले. त्यामुळे गिरीश महाजन यांचं मी अभिनंदन करेल असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले आहे. 

राऊत म्हणाले, राज्यपाल जर शासन चालवणार असतील निवडून आलेल्यांचे काय? महाविकास आघाडी सरकार असतांना राज्यपाल फारच सक्रिय होते असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, जणू काही तेच राज्यकर्ते, तेच राज्य सरकार चालवत होते, तेच पत्र लिहीत होते. आता त्यांची पत्र दुसरं कोणी लिहीत आहे का? 

मी यापूर्वी ट्विट केले होते, त्यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे होते, त्यात शिवसेना मध्ये येईल म्हणून शिवसेनेचे तुकडे करा असं मी म्हंटलं होतं. म्हणून आधी शिवसेना पक्ष तोडण्याचे काम केले जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय धोरण होते आणि त्यांनी ते राबविले, जे आमच्या खोके बहाद्दर चाळीस आमदारांना समजले नाही. ते चाळीस आमदार भाजपच्या कटात सहभागी झाले, त्यामुळे शिवसेना पक्ष फोडण्याचा कट अमलात आला असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.