Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रेम प्रकरणातून नवविवाहितेचा खून करून एकाची आत्महत्या

प्रेम प्रकरणातून नवविवाहितेचा खून करून एकाची आत्महत्या



कराड : खरा पंचनामा

प्रेम प्रकरणातून नवविवाहितेचा खून करून एका प्रेमवीराने आत्महत्या केली. या घटनेमुळे खटाव व कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे. वांझोळी (ता. खटाव) येथे ही घटना घडली.

स्नेहल वैभव माळी (वय 22, रा. शामगाव, ता. कराड) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तर दत्तात्रय सुरेश माळी (वय 27, रा. वांझोळी, ता. खटाव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दत्तात्रय माळी याने एक चिठ्ठी लिहली होती, ती चिठ्ठी आपल्या मोबाईलवर स्टेटसलाही ठेवली होती.

वांझोळी येथील दत्तात्रय माळी व स्नेहल यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी स्नेहल हिचा शामगाव येथील युवकाशी विवाह झाला होता. शामगाव हे तिचे सासर असून दोन महिन्यांनंतर ती शनिवारी आपल्या माहेरी वांझोळीत आली होती. दत्तात्रय व स्नेहलचे घर काही अंतरावर आहे. रविवारी सायंकाळी दत्तात्रय याने 'मला तुझ्याशी काही बोलायचे आहे', असे सांगून स्नेहलला आपल्या घरी बोलावून घेतले होते. दरम्यान, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दत्तात्रय याने स्नेहल हिच्यावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार केले. स्नेहलला वर्मी घाव लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दत्तात्रय यानेही त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

काही वेळानंतर दत्तात्रय व स्नेहल यांच्या आई दोघीही एकत्रित दत्तात्रय याच्या घरी आल्या. त्यावेळी त्यांना स्नेहल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली तर दत्तात्रय याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच औंध व पुसेसावळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.