Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पत्रकार वारीशे यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित; संशयिताची कबुली

पत्रकार वारीशे यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित; संशयिताची कबुली 



राजापूर : खरा पंचनामा 

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. यादरम्यान या प्रकरणात आता मोठा खुलासा समोर आला आहे. 

वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणात संशयित पंढरीनाथ आंबेरकर हा सध्या पोलिस कोठडीत आहे. आता आंबेरकर याने वारीशे यांच्यावरील हल्ला हा पुर्वनियोजित असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी 11 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हा तपास होणार आहे. अशी माहिती रत्नागिरीचे एसपी धनंजय कुलकर्णी यांनी दिली. 

दरम्यान आंबेरकरला मंगळवारी राजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आंबेरकरला अटक केलेल्या राजापूर पोलिसांनी बुधवारी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या प्रकरणी अटकेत असलेल्या आंबेरकरने गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच आंबेरकर याने पत्रकार वारीशे यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कृत्य असल्याचे मान्य केले आहे. तसेच आम्हाला त्याचे बँक खाते तसेच कॉल रेकॉर्डचे तपशील मिळाले आहेत. या कृत्यात आणखी काही लोक गुंतले आहेत का हे तपासण्यासाठी आम्ही त्याची छाननी करत आहोत. असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

ते पुढे म्हणाले, आम्हाला यापूर्वीच्या प्रकरणांची आणि आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींचीही माहिती मिळाली आहे. त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. रिफायनरी विरोधी कार्यकर्त्यांना धमकावणे आणि मारहाण करणे. कारण तो रिफायनरी समर्थक होता आणि प्रकल्पासाठी भूसंपादन सोपे व्हावे यासाठी काम करत असे. आम्ही या मागील प्रकरणे आणि तक्रारी पाहतो आहोत असेही त्यांनी सांगितेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.