अदानीबाबत पुरावे असतील तर ते समितीकडे द्यावे : अमित शाह
नवी दिल्ली : खरा पंचनामा
गौतम अदानी यांच्यावरील आरोपांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निवृत्त न्यायाधीशांसह दोन सदस्यीय समिती स्थापन केली असून प्रत्येकानं जाऊन त्यांच्याकडं जे काही पुरावे आहेत ते सादर करावेत. चूक झाली असेल तर कुणालाही सोडू नये. प्रत्येकाचा न्यायप्रक्रियेवर विश्वास असायला हवा. लोकांनी बिनबुडाचे आरोप करू नये, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच तपास यंत्रणा आणि अदानी प्रकरणावर खुलेपणाने बोलले. सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणा निष्पक्षपणे काम करत आहेत. शाह म्हणाले, 'विरोधी नेत्यांचे सर्व आरोप निराधार आहेत. जर त्यांना तपास यंत्रणांच्या कामावर शंका असेल तर ते त्यांना न्यायालयात आव्हान देऊ शकतात. '
या तपास यंत्रणा काही न्यायालयाच्या वर नाहीत. कोणतीही नोटीस, एफआयआर आणि आरोपपत्र यांना न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. कोर्टात जाण्याऐवजी विरोधी नेते बाहेर का ओरडत आहेत? मला जनतेला विचारायचं आहे, जर कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्याची चौकशी व्हायला नको का? ही सर्व प्रकरणं भाजप सरकारच्या काळात नव्हे, तर यूपीए सरकारच्या काळात नोंदवण्यात आली होती. याकडंही शाहांनी लक्ष वेधलं.
शाह म्हणाले, 'काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत 12 लाख कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप झाले होते, तेव्हा परिस्थिती निवळण्यासाठी सरकारनं सीबीआयमार्फत गुन्हा दाखल केला होता. मनी लाँड्रिंगचं प्रकरण असल्यास ईडी त्याची चौकशी करण्यास बांधील आहे.' तपास यंत्रणा विरोधी नेत्यांना टार्गेट करत असल्याच्या आरोपाबाबत शाह म्हणाले, 'या नेत्यांना न्यायालयात जाण्यापासून कोण रोखत आहे? त्यांच्या पक्षात आमच्यापेक्षा चांगले वकील आहेत.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
