इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा राजू शेट्टी यांना फोन : दोन दिवसांत मुंबईत बैठक
कोल्हापूर : खरा पंचनामा
राज्य शासनाच्या वतीने आज शासन आपल्या दारी हा उपक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारणार होते.
मात्र राजू शेट्टी यांनी विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात काल सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दूरध्वनीवरून राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली. १५ जूनला दुपारी ३.०० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे असे त्यांनी शेट्टी यांना सांगितले.
त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येणारे कोल्हापूरातील आंदोलन आगामी दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. या मुद्याबाबत जर १५ जूनच्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही तर येथून पुढे राज्यातील होणारे शासन आपल्या दारी या उपक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कार्यकर्ते उपस्थित राहून सरकारला याचा जाब विचारतील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.