Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोफत दिलेली पुस्तके 'बालभारती' परत घेणार?

मोफत दिलेली पुस्तके 'बालभारती' परत घेणार?



मुंबई : खरा पंचनामा

बालभारती विद्यार्थ्यांसाठी अनेक विषयांवर अभ्यासक्रमातील पुस्तकं बनवण्याचं काम करत असतं. त्यात वेळोवेळी योग्य ते बदलही करण्यात येतात. असाच एक बदल यंदा करण्यात आला होता. मात्र या बदलामुळे बालभारती मोफत दिलेली पुस्तकं परत घेण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे.

विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं जास्त होऊ नये म्हणून यंदा पुस्तकांसोबतच वह्यांची पानंही जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसं करण्यातही आलं होतं. मात्र आता ही पुस्तकं बालभारती परत घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसं आवाहनच बालभारतीकडून शाळांना करण्यात आलं आहे. बाल भारती कडून मोफत दिली गेलेली पठ्या पुस्तकांची पाने सुटतायेत अशी चर्चा आहे. त्यामुळे ज्या पुस्तकांची पाने सुटली असतील त्या त्या शाळांनी पुस्तके परत करावीत त्या ठिकाणी नवीन पुस्तके दिली जातील असं आवाहन बालभारतीकडून शाळांना करण्यात आलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.