Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय' मनोज जरांगेंचा आरोप; बेमुदत उपोषण सुरु

'आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय' 
मनोज जरांगेंचा आरोप; बेमुदत उपोषण सुरु



जालना : खरा पंचनामा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरू झालंय सरकारने आश्वासन देऊनही 40 दिवसानंतर आरक्षण न दिल्याने जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेयत. आता अन्न, पाणी, वैद्यकीय उपचारही घेणार नाही, असं कडक उपोषण करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय .40 दिवस उलटूनही सरकारने गुन्हे मागे घेतले नाहीत. आत्महत्या केलेल्यांना मदत नाही. सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय.

जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणावर बसलेल्या जरांगेंना सरकारने उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र जरांगेंनी ती फेटाळून लावलीय. मंत्री गिरीश महाजनांनी उपोषणाला बसलेल्या जरांगेंना फोन केला. उपोषण मागे घेण्याची विनंती महाजनांनी जरांगेंना केली. मात्र सरकारने दोन दिवसांत गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काहीच झालं नाही मग आरक्षणाचं कसं होणार असा सवाल जरांगेंनी महाजनांना केलाय. लेकरांच्या पोटाचा प्रश्न असल्याने आता हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय.

'मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय' मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना  कोणीतरी अडवत असल्याचा आरोप जरांगेनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रामाणिक आहेत. मात्र कोणीतरी अडवत असल्याने मुख्यमंत्री आरक्षणाचा निर्णय घेत नसल्याचा आरोप जरांगें नी केलाय. त्यामुळे आरक्षणापासून मुख्यमंत्र्यांना अडवणारे झारीतले शुक्राचार्य कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.

मराठा आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.