अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी; विश्वासघात करणाऱ्यावर काय विश्वास ठेवावा?
मुंबई : खरा पंचनामा
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत स्वार्थासाठी बंड केले होते असे विधान शालिनीताई पाटील यांनी केले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानाचे अंतर आहे. शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी अजित पवारांचे बंड होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केली आहे.
पुढे शालिनीताई पाटील म्हणाल्या, 2024 मध्ये देवेंद्र फडणवीसच निवडणूक येतील असा विश्वास देखील शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जो माणूस विश्वासघात करतो त्याच्यावर काय विश्वास ठेवावा असे शालिनीताही पाटील यांनी म्हंटले आहे.
ज्याने तुम्हाला लहानाचे मोठे केले त्याचाच विश्वासघात केला मग अशा व्यक्तीवर विश्वास का ठेवावा?, अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. अजितदादांसोबत गेलेली माणसे कोणत्या लायकीचे आहेत हे मी आधीच सांगितले. त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. त्यानंतर जी दुर्दशा होईल. तुरुगात आजीवन कारावास भोगून आलेल्या व्यक्तीसोबत जे होते. त्याला निवडणूक लढवता येत नाही', असे शालिनीताई पाटील यांनी म्हंटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.