Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजकीय संस्कृतीचे धिंडवडे काढले जातायेत जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका

राजकीय संस्कृतीचे धिंडवडे काढले जातायेत
जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका



मुंबई : खरा पंचनामा

आज सत्तेत सामील असलेले मंत्री, आमदार, खासदार कधी सामान्य माणसांवर लाठीचार्ज करायला सांगतात. तर कधी पोलीस बांधवांच्या कानशीलात लगावतात तर कधी एकमेकांचा पाणउतरा करतात. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पार धिंडवडे काढले जात आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सत्ताधारी सरकारवर टीका केली आहे. 

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघाले. असा आरोप देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख आणि अनेक मोठ्या नेतृत्वाचा आदर्श या महाराष्ट्राला आहे. या नेत्यांनी कधी आपली पातळी खाली जाऊ दिली नाही. पण सध्याचे नेते मात्र आपली संस्कृती विसरले आहे. हे महाराष्ट्र बघतोय ! याचा जाहीर निषेध करत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.