Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ईरेगांव येथे अंगावर वीज पडल्यांने शेतकऱ्याचा जागीच मृत्यु

ईरेगांव येथे अंगावर वीज पडल्यांने शेतकऱ्याचा जागीच मृत्यु



संभाजी पुरीगोसावी 
नांदेड : खरा पंचनामा

किनवट तालुक्यांत काल अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे ईरेगांव शेती शिवारामध्ये एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

लक्ष्मण दशरथ मांगीरवाड (वय ३०) शेतातुन घरी परत येत असताना, सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील दोन मुले, चार भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. 

ईस्लामपुर प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी मौजे ईरेगांव येथे अंत्यसंस्कार  करण्यात आले. या घटनेमुळे ईरेगांव परिसरांत शोककळा पसरली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.