"खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही"
कोल्हापूर : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही शिवसेनेचे मेळावे, अमित शाह यांच्याकडून होणारी टीका, आगामी निवडणुका, उदय सामंत यांचे आमदार फुटण्याचे दावे, दावोसमधील गुंतवणूक याबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह आणि त्यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे असं शरद पवार म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्यासाठी दोघांनी कार्यक्रम घेतले. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्याचा अधिकार आपला आहे असं दोघांनाही वाटतं आणि त्याची प्रचिती आपण पाहिली. पण लोकांची उपस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक होती, असं निरिक्षणावरुन दिसतं, असं शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी याच्या अगोदर मतं मांडलं होतं. दोन दिवसांपूर्वी ते माझ्याकडे आले होते, सविस्तर चर्चा झाली. काल त्यांनी जे काय सांगितलं तसं त्यांचं मत आहे, मात्र त्यासाठी टोकाची भूमिका घेतली जाईल, असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.
अमित शाह यांच्यावर टीका आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ठाकरेंनी मौन बाळगलं असं पाहायला मिळालं असं विचारलं असता शरद पवार यांनी तसं वाटत नसल्याचं म्हटलं. अमित शाह सातत्यानं हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेतृत्त्वानं घेतलेली आहे. अमित शाह आणि त्यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री अधिक तारतम्य ठेवून भाष्य करेल, अशी अपेक्षा असते. त्याची प्रचिती तिथून काही येत नाही. खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत. अमित शाह हे कोल्हापूरला शिकले की कुठं शिकले मला माहिती नाही, असं शरद पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.