तरुण अधिकाऱ्यांना अशी पदके मिळावी : पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी
राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल कराडमध्ये सत्कार
कराड : खरा पंचनामा
लोकशाहीच्या हक्काचे रक्षण केले जात असल्याचा समाजाला विश्वास देण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. पोलिसांनी आनंदाने काम करताना जनतेच्या दुःखावर फुंकर मारावी. त्यामुळे जनता आपल्यासोबत राहील आणि जनतेला पोलिस आपल्यासोबत असल्याचा विश्वास वाटेल, असे प्रतिपादन कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
केंद्र सरकारतर्फे दोनदा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल श्री. फुलारी यांचा पोलिस व नागरिकांच्या वतीने त्यांचा येथे सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पाटणचे पोलिस उपअधीक्षक विजय पाटील, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, अॅड. संभाजीराव मोहिते, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार, तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप उपस्थित होते.
विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी म्हणाले, "पोलिसांची वागणूक चांगली नसते, ही समाजाची भावना आहे. ती दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. जेथे जातो तेथे सर्वसामान्यांना भेटतो. विधानसभा, लोकसभा निवडणूक ३० हजार पोलिसांच्या मदतीने एकही हिंसाचाराची घटना घडली नाही. कोल्हापूर राज्यात मतदानात एक नंबरवर असून, सातारा, सांगली त्यामागोमाग आहे.
त्यातून लोकशाही येथे जिवंत असून, लोकशाहीच्या हक्काचं रक्षण केले जाते, हा समाजाला विश्वास देण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. यापुढे मला पदक मिळण्यापेक्षा तरुण अधिकाऱ्यांना अशी पदके मिळावी. १०० दिवसांच्या कार्यक्रमात सातारा जिल्हा हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो एक नंबरवर येण्यासाठी प्रयत्न करावेत."
पोलिस अधीक्षक श्री. शेख, अॅड. मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस उपअधीक्षक ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. रत्नाकर शानभाग, महेंद्र भोसले यांनी सूत्रसंचालन केले. श्री. ताशीलदार यांनी आभार मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.