अबू आझमी यांच्या निलंबनाच्या मागणीवरून गोंधळ
विधानसभेचे कामकाज दिवसभर तहकूब
मुंबई : खरा पंचनामा
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेब समर्थनाच्या वक्तव्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला. आझमी यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी करण्यात आली, त्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी, नंतर अर्धा तास आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तारांकित प्रश्नांची सुरुवात होण्याआधीच सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. आमदार सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर आणि मंत्री उदय सामंत यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. विधानसभेतील शिवसेना गट नेते भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी मिळाली असता, सत्ताधारी पक्षाने गदारोळ केला.
गोंधळ वाढताच विधानसभा अध्यक्षांनी सुरुवातीला दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्याने नंतर अर्धा तास आणि दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.