Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यात 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : खरा पंचनामा

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आपले सत्र राज्य सरकारने सुरूच ठेवले असून मंगळवार, 8 एप्रिल रोजी पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. त्या पदावर आठवड्याभराने हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता मेश्राम यांची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

राज्य सरकारने राज्यातील 5 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. यामध्ये हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता मेश्राम यांचाही समावेश आहे. अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सी. के. डांगे यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस संजय काटकर यांची नियुक्ती. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या आयएएस अनिता मेश्राम यांची आता अकोला येथील जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती. आयएएस अभिनव गोयल हे हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांची नियुक्ती आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी. आयएएस आयुषी सिंह यांची नागपूर येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.