Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारांच्या अटकेचे प्रमाण अत्यल्प !

महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारांच्या अटकेचे प्रमाण अत्यल्प !

मुंबई : खरा पंचनामा

राज्याला सायबर गुन्हेगारांनी विळखा घातला असून सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलीस विभागाला अपयश आले आहे. राज्यात दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत आरोपी अटकेचे प्रमाण अत्यल्प आहे.

गेल्या वर्षभरात मुंबईत सर्वाधिक ७५७ सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे तर दुसऱ्या स्थानावर ठाणे (१३) शहराचा क्रमांक लागतो. राज्यात जवळपास ९ हजार सायबर गुन्हे दाखल असून त्यापैकी केवळ १ हजार ७ सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे, ही माहिती पोलीस विभागाच्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे.

सायबर गुन्हेगारांनी अनेकांच्या खात्यातून पैसे परस्पर लंपास करणे सुरू केले आहे. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी सायबर पोलीस तसेच अद्ययावत तपास तंत्रे अस्तित्वात आली आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी), डाटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया (डीएससीआय), सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा आदींची यासाठी स्थापना करण्यात आली. मुंबई आणि पुण्यातही या मोठमोठ्या प्रयोगशाळा अस्तित्वात आहेत. तसेच आता प्रत्येक शहरात स्वतंत्र्य सायबर पोलीस ठाणे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा तयार करूनही देशातील सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत.

राज्यात मुंबईत सर्वाधिक सायबर गुन्हे दाखल आहेत. मुंबईत ४८४९ सायबर गुन्हे दाखल असून ७५७ सायबर गुन्हेगारांना मुंबई पोलिसांनी अटक केली. मात्र, राज्यातील अन्य पोलीस आयुक्तालयाकडून सायबर गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई होताना दिसत नाही. ठाणे शहरात ६८० गुन्हे दाखल करण्यात आले असून फक्त १३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. पुणे शहरात १५०४ सायबर गुन्हे दाखल असून ९ सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली. सर्वात शेवटच्या स्थानी नागपूर शहराचा क्रमांक लागतो. नागपुरात २१२ सायबर गुन्हे दाखल असून फक्त ५ सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून महाराष्ट्र पोलिसांचे अपयश स्पष्टपणे दिसते.

डिजीटल अरेस्ट, ओटीपी-पासवर्ड विचारून फसवणूक, सेक्स्टॉर्शन, शेअर ट्रेडिंग आणि लिंक पाठवून सायबर गुन्हेगार राज्यात लूट करीत आहेत. राज्यात २०२४ मध्ये सायबर गुन्हेगारांनी ७ हजार ६३४ लाख कोटी रुपयांनी फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांनी पुण्यात सहा हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर मुंबईत ८८८ कोटी २९ लाखांनी फसवणूक झाली. ठाणे शहरात १७४ कोटी ४ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. गृहमंत्र्याच्या नागपूर शहरात ६३ कोटी ८५ लाखांनी फसवणूक करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.