"अजित पवार, एकनाथ शिंदे दोघे पण संवाद साधण्यात चांगले नाहीत"
मुंबई : खरा पंचनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतात. विकासाचा मुद्दा असो की विरोधी पक्षावर निशाणा साधणे असो फडणवीस खास शैलीत समाचार घेतात. गेल्या 35 महिन्यात त्यांनी भारतीय जनता पक्षाला भक्कम करण्यात आणि त्यांच्या मागील कार्यकाळातील विकास योजनांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर थेट भाष्य केले. त्यांच्या वक्तव्याची आता राज्यात चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव जिहादवर भाष्य केले. या शब्दावर नेहमी वाद होतो. पण काही जिल्ह्यात प्रेम संबंधाच्या आडून शोषण करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक जिल्ह्यात लव जिहाद ही वास्तविकता आहे. जेव्हा लव जिहादची गोष्ट समोर येते. तेव्हा तुम्हाला वाटतं की ही अतिशयोक्ती आहे. पण काही जिल्ह्यात या घटना घडतात, हे सत्य आहे, असे फडणवीस म्हणाले.
अर्थात प्रत्येक प्रकरणात चिंता व्हावी असे नाही. पण काही पॅटर्न मात्र चिंता निर्माण करणारे आहेत. मी आंतरजातीय विवाह अथवा आंतरधर्मीय लग्नाच्या विरोधात नाही. पण फसवणूक करून मुलीशी लग्न करून तिचे शोषण करण्यात येतो, तेव्हा हा विषय गंभीर होतो, असे फडणवीस म्हणाले. या संदर्भात ज्याविषयी सत्यता समोर आली, ठोस पुरावे हाती आले. त्यावेळी आपण त्यावर बोललो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या सहकार्यांविषयी प्रश्न करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत ते सरकारचा गाडा हाकत आहेत. त्यांच्याविषयी फडणवीस यांना प्रश्न करण्यात आला. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पैकी कोण चांगल्याप्रकारे व्यक्त आणि एकनाथ शिंदे यांच्या पैकी कोण चांगल्याप्रकारे व्यक्त होते, संवाद साधते अशी गुगली त्यांना टाकण्यात आली. त्यावेळी त्यांनी साधेपणाने सांगितले की दोघे पण संवाद साधण्यात चांगले नाहीत. मला अपेक्षा आहे की त्यांना माझ्या बोलण्याचे वाईट वाटणार नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.