Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रातील तब्बल 295 बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द!

महाराष्ट्रातील तब्बल 295 बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द!

मुंबई : खरा पंचनामा

तुमचेही शिक्षक बनण्याचे स्वप्न आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर, शिक्षक बनण्याची इच्छा असणारे अनेक विद्यार्थी बीएडला ऍडमिशन घेतात. बीएडला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्या राज्यात सुद्धा फारच अधिक आहे. दरम्यान, जर तुम्हीही बीएडला ऍडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी एक कामाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडून महाराष्ट्रातील तब्बल 295 बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

मूल्यांकन अहवाल सादर न करणाऱ्या महाराष्ट्रातील बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय परिषदेकडून घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून या संबंधित मान्यता रद्द झालेल्या महाविद्यालयांना नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता आपण परिषदेने हा निर्णय नेमका का घेतला याचा आढावा देणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात एनसीटीईने देशभरातील शिक्षक प्रशिक्षण संस्थांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार परिषदेकडून बीएड महाविद्यालयांना 2021-22 आणि 2022-23 या दोन शैक्षणिक वर्षांतील कामगिरीविषयीचा अहवाल ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात आले होते. मात्र महाराष्ट्रातील 295 महाविद्यालयांनी परिषदेने आदेश दिल्यानंतरही आपला अहवाल सादर केला नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे या महाविद्यालयांसाठी परिषदेकडून वेळोवेळी मुदतवाढ सुद्धा देण्यात आली होती. पण दिलेल्या मुदतवाढीनंतरही अहवाल सादर झाला नाही. परिणामी संबंधित महाविद्यालयांना परिषदेकडून कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली.

मात्र या कारणे दाखवा नोटीसला सुद्धा संबंधित महाविद्यालयाकडून उत्तर देण्यात आले नाही आणि अखेरकार आता परिषदेकडून या संबंधित बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

परिषदेकडून घेण्यात आलेला हा निर्णय नक्कीच योग्य आहे पण या निर्णयानंतर राज्यातील विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे यंदाच्या Bed प्रवेश प्रक्रियेवर मोठा परिणाम होणार असे तज्ञांचे म्हणणे आहे.

राज्यातील सर्वाधिक महाविद्यालयांवर या निर्णयाचा परिणाम झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे आता या मान्यता रद्द झालेल्या महाविद्यालयाकडून काय भूमिका घेतली जाते, मान्यता रद्द होऊ नये यासाठी संबंधित महाविद्यालय काही उपाययोजना करतात का ? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.