आता फक्त याच प्रवाशांना मिळणार तत्काळ तिकीट
रेल्वेमंत्र्यांचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : खरा पंचनामा
रेल्वे वाहतूक हा देशातील दळणवळणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक दशकांपासून रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना जोडण्याचे काम केले आहे. भारतीय रेल्वेमधून असंख्य लोकं प्रवास करतात.
अशा सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने आता तत्काळ तिकीटांच्या बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने आता तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ई-आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले जाणार आहे. खासकरून तिकीट दलाल आणि बेकायदेशीर बुकिंग थांबवण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य आणि गरजू प्रवाशांना वेळेत तिकीट उपलब्ध होण्यास मदत होईल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लवकरच तात्काळ तिकिटे बुक करताना ई-आधार प्रमाणीकरण आवश्यक असणार आहे. यामुळे प्रत्येक प्रवाशाला त्यांची ओळख डिजिटल पद्धतीने पडताळावी लागेल, ज्यामुळे बनावट बुकिंग आणि बॉट्सद्वारे तिकिटे खरेदी करण्याच्या घटनांना आळा बसेल. समोर आलेल्या माहितनुसार, पहिल्या 10 मिनिटांसाठी ज्या प्रवाशांचे आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक असेल त्याच प्रवाशांना तात्काळ तिकीट बुक करता येणार आहे. IRCTCच्या दलालांना या 10 मिनिटांत बुकिंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ई-आधार पडताळणीच्या या नवीन उपक्रमामुळे बनावट तसेच लिपी-आधारित बुकिंग थांबेल. तर त्याच वेळी प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि चांगला होईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.