संतप्त शेतकऱ्यांचा पंचगंगेत उडी मारण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : खरा पंचनामा
शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असलेल्या शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आज (दि. १) कृषिदिनी सकाळी ११ वाजता शिरोली येथील पंचगंगा पुलावर आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी काही आक्रमक शेतकऱ्यांनी पंचगंगा नदीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला. एकीकडे महामार्ग रोको आंदोलन सुरू असले तरी दुसरीकडे काही आक्रमक शेतकऱ्यांनी आपण आत्महत्या करणार असे म्हणत नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती कमी आहे. त्यामुळे काही शेतकरी भूमीहीन होणार आहेत. मग आम्हाला जगून काय अर्थ आहे? असे म्हणत या सगळ्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि या सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, या महामार्गासाठी १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची लाखो हेक्टर जमीन जाणार आहे. मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महामार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज कृषी दिनी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात कृती समितीसह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.