अजित पवार, एकनाथ शिंदे तातडीने मुंबईला रवाना
मुंबई : खरा पंचनामा
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांची तब्येत देखील खालावत आहे. मात्र, आपल्या आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. शनिवारी शिंदे समितीने त्यांची भेट घेतली मात्र तरी देखील त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार ऍक्शन मोडवर आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. मात्र, ते दर्शन घेऊन मुंबईकडे तातडीने रवाना होणार असल्याची माहिती आहे. तर, पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन ग्रामपंचायत नवीन ग्रामसचिवालयाचे उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले असून ते देखील तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.
दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबईत दाखल होत जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यातच आज पुन्हा मराठा उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकी देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि त्यावर कसा प्रतिसाद द्यायचा याचे देखील नियोजन सरकारकडून केले जात असल्याची माहिती आहे.
शनिवारी शिंदे समितीने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र, ते आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. दरम्यान, मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवास्थान वर्षावर गेले. तेथे तिघांमध्ये एक तास चर्चा झाली. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून हालचाल सुरू झाली असल्याचे चित्र आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.