मुख्यमंत्र्यांनी चक्क स्वतःच्या घराची भिंतच पाडली!
हैद्राबाद : खरा पंचनामा
राजकारण म्हटलं की स्वार्थ हा आलाच. प्रत्येक रा राजकारणी व्यक्ती हा प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ पाहतो, असे अनेकदा म्हटले जाते. पण तेलंगणाचे तरुण आणि तडफदार मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे यासाठी अपवाद ठरले आहेत.
रेवंत रेड्डी यांनी विकासकामांमध्ये सर्वसामान्य आणि राजकीय नेत्यांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही, हे केवळ बोलून दाखवले नाही, तर स्वतःच्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. नागरकुरनूल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी कोंडारेड्डीपल्ली येथे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतलेला एक निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे त्यांची एक वेगळीच प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये तयार झाली आहे.
सध्या कोंडारेड्डीपल्ली गावात रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याच कामादरम्यान तेलंगणाचे तरुण मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक आदर्श घालून दिला आहे. नागरकुरनूल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी कोंडारेड्डीपल्ली या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते. या कामात अडथळा येत असल्याचं लक्षात येताच त्यांनी कोणताही विचार न करता स्वतःच्या घराची भिंत पाडण्याचे आदेश दिले.
या रस्त्याच्या कामासाठी गावातील ४३ घरांचे काही भाग पाडण्यात आले होते. त्यामुळे गावकऱ्यांना नुकसान भरपाई देखील देण्यात आली. याच दरम्यान त्यांच्या स्वतःच्या घराची भिंतीचा अडथळा रस्त्याला येत होता. मात्र मुख्यमंत्री रेड्डी यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या घराची भिंत पाडण्याचा निर्णय घेतला. यामुळे गावातील लोक त्यांचे कौतुक करत आहेत. त्यांनी दाखवलेल्या निस्वार्थ वृत्तीमुळे आणि लोकांच्या हिताचा विचार केल्यामुळे त्यांची प्रशंसा होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.