Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्री नवस फेडायला दिल्लीला जातात : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री नवस फेडायला दिल्लीला जातात : उद्धव ठाकरे



नागपूर : खरा पंचनामा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्व मानणारे आहेत. ते नेहमी देवदर्शनाला दिल्लीला जात असतात. आजचा दिवस गेला म्हणून नवस फेडण्यासाठी, तर उद्याचा दिवस नीट जावा म्हणून नवस करण्यासाठी ते दिल्लीला जातात, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. ते सीमावादाच्या मुद्दयावर केव्हा नवस करणार, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

कर्नाटकातील लोकांकडून मराठी भाषिक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. त्याविरोधात सरकार बोलायला तयार नाही. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले. सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट बघत आहोत, तो निकाल आल्यानंतर एक इंचही जमीन आम्ही कर्नाटकाला देणार नाही, असा दमही त्यांनी यावेळी दिला. 

हिवाळी अधिवेशनात मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घातल्यामुळे अधिवेशनाचे दिवस वाया गेल्याचे ते म्हणाले.

आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. वातीही बाहेर काढून ठेवल्या आहेत. आता फक्त पेटवायचा अवकाश आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.