Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयंत पाटील यांचा दावा ठरला फोल?

जयंत पाटील यांचा दावा ठरला फोल?



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाने प्रचंड शक्तीप्रदर्शन केलं. दोन्ही गटाकडून 'आमच्याकडेच सर्वाधिक आमदार असल्याचा दावाही करण्यात आला. अजित पवार गटाने त्यांच्याकडे 40 आमदार असल्याचा दावा केला. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे 19 आमदारांचं बळ असल्याचा दावा केला होता. 

कालच जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडे 19 आमदार असल्याचा दावा केला होता. पण आज त्यांचा हा दावा फोल ठरल्याचं दिसून येत आहे. विधीमंडळाचं अधिवेशन सुरू होताच उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सर्व आमदार होते. अजितदादांनी आपल्या आमदारांसोबत शक्तीप्रदर्शनही केलं. त्यानंतर ते सभागृहात निघून गेले. सभागृहात अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या आमदारांची बसण्याची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली होती. अजितदादा गटाना अधिक जागा देण्यात आली होती. त्यांची आमदार संख्याही अधिक होती. मात्र, शरद पवार गटाच्या जागेवर फक्त आठच आमदार बसलेले होते. त्यामुळे शरद पवार गटाच्या मागे फक्त आठच आमदार आहेत का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.