Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कवलापूरात विद्यार्थ्यांचे अपहरण करुन मारहाण

कवलापूरात विद्यार्थ्यांचे अपहरण करुन मारहाण



सांगली : खरा पंचनामा 

महिलेची बदनामी करत असलेल्या संशयावरुन तिघांनी एका विद्यार्थ्यांचे अपहरण करुन त्यास मारहाण केली. त्यानंतर त्यास एका महाविद्यालयाच्या दारात सोडून तेथून पलायन केले. ही घटना १२ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी पाटील, अजित पाटील आणि अन्य दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत विनायक सरदार सावंत (वय १९, रा. पानमळेवाडी, ता. तासगाव ) याने फिर्याद दिली आहे. 

संशयीत संभाजी पाटील, अजित पाटील आणि अन्य दोघांनी विनायक सावंत यास जबरदस्तीने चारचाकीत घातले. त्याला तू महिलेची बदनामी का करतोस असा जाब विचारला. तसेच त्याला कवलापूर येथे नेवून मारहाण केली. त्यानंतर त्याला कुमठे गावातून थोड्या अंतरावर असलेल्या एका माळावर नेले तेथे त्यास मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला एका महाविद्यालयाच्या समोर आणून सोडले आणि तेथून पलायन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.