Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बाबरी पाडली तेव्हा फक्त भाजपचीच मंडळी, शिवेसेनेचे कोणीच नव्हते

बाबरी पाडली तेव्हा फक्त भाजपचीच मंडळी, शिवेसेनेचे कोणीच नव्हते



जालना : खरा पंचनामा

बाबरी पाडली तेव्हा भाजपचीच मंडळी तिथे होती. बाकी शिवसेनेचे कोणीच नव्हते असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांनी बाबरी पाडतानाच्या आठवणी सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली.

मंदीर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे असं आम्हाला हिणवलं जायचं. पण मोदींच्या नेतृत्वात आम्ही हे करुन दाखवलं, असेही ते म्हणाले.

बाबरी मशिद पाडली होती तेव्हा तिथे भाजपसोडून कोणीच नव्हते. हे केवळ वाचाळवीर आहेत. कुठल्या संघटनेने क्रेडीट घ्यायचे नाही, कारसेवकांनी मशिद पाडली सांगायचे, असे आम्हाला सांगण्यात आले होते. आम्ही शिस्त पाळणारे होतो. म्हणून आम्ही कारसेवकांचे नाव सांगितले. दरम्यान कोणीतरी बाळासाहेबांना प्रश्न विचारला, तुमच्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली का? तेव्हा त्यांनी माझ्या शिवसैनिकांने बाबरी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे, असे विधान केल्याची आठवण फडणवीसांनी करुन दिली. बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते तिथे होते, असे फडणवीसांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.