Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिरसाट यांच्या त्या वक्तव्याचा जयंतराव पाटलांनी एकाच वाक्यात निकाल लावला

शिरसाट यांच्या त्या वक्तव्याचा जयंतराव पाटलांनी एकाच वाक्यात निकाल लावला



सांगली : खरा पंचनामा

जयंत पाटील अजित पवार सोबत येणार होते म्हणून आमच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता. जयंत पाटीलच याबाबत शरद पवारसाहेबांना सांगणार होते. जयंत पाटील शरीराने तिकडे आहेत मनाने इकडे आहेत. जयंत पाटील आता आले नाहीत. मात्र ते आमच्यासोबत येतील, असं संजय शिरसाट यांना काल म्हटलं. शिरसाट यांच्या दाव्यावर आता जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

प्रत्येक जण निवडणूक जिंकण्यासाठीच प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रातील लोक आमची भूमिका मान्य करतील अशी आशा आहे. चांगलं राज्य चालवण्यासाठी जनता आम्हाला आशीर्वाद देतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचाही अस्तित्व महाराष्ट्रात मोठं आहे. ही अस्तित्वाची नाही तर विचारांची लढाई आहे. सद्यस्थितीला देशाची स्थिती चिंताजनक ज्यांना वाटते. त्यामुळे अनेकजण आमच्यासोबत यायचा विचार करतील, असंही जयंत पाटील म्हणालेत. निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पक्षांतर्गत बैठकीत दिल्लीला झाल्या आहेत. लवकरच हे जागावाटप पूर्ण होईल, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.