गहाळ झालेले 3.30 लाखांचे तब्बल 30 मोबाईल नागरिकांना दिले परत
इस्लामपूर पोलिसांची कारवाई : निरीक्षक हारूगडे
सांगली : खरा पंचनामा
बाजार, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेले 30 नागरिकांचे मोबाईल शोधून त्यांना परत देण्यात आले. या सर्व मोबाईलची किंमत सुमारे 3.30 लाख रुपये असल्याची माहिती इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे विविध बाजार, बसस्थानक, गर्दीची ठिकाणे येथे अनेक नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली होती. ते मोबाईल तांत्रिक तसेच अन्य माहितीच्या आधारे शोधण्याच्या सूचना पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक हारूगडे यांचे पथक गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेत होते.
तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने सांगली तसेच राज्यातील अन्य जिल्हे आणि परराज्यातून मोबाईल शोधून काढले. ते मोबाईल संबंधित नागरिकांना निरीक्षक हारूगडे यांच्याहस्ते परत देण्यात आले. इस्लामपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाने अमोल सावंत, विशाल पांगे, शंशीकांत शिंदे, दिपक घस्ते, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.