Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'कळू देत लोकांना, हे खच्चीकरण कोण करतेय ते'

'कळू देत लोकांना, हे खच्चीकरण कोण करतेय ते'

मुंबई : खरा पंचनामा

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नियोजित भाषण करू देण्यात आले नव्हते. शिंदे यांनी चैत्यभूमीवरच संताप व्यक्त केल्याचे समजते. 'कळू देत लोकांना, कोण खच्चीकरण करतंय ते' या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत नाराजी उघड केली.

शासकीय कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणारा राजशिष्टाचार विभाग भाजपकडे असल्याने शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्याकडून खच्चीकरण होत असल्याचा ठपका ठेवला आहे.

शिंदे यांना आयत्यावेळेला भाषण करायला लावायचे किंवा भाषणाची तयारी केल्यावर करु द्यायचे नाही, अशा घटनांमुळे होणाऱ्या मानहानीमुळे शिंदे नाराज असल्याचे समजते.

चैत्यभुमीच्या कार्यक्रमात शिंदे यांचे भाषण होणार असल्याचे शिंदे यांच्या कार्यालयाला कळविले होते. वक्त्यांच्या यादीमध्ये शिंदे व अजित पवार यांच्या नावांचा समावेश होता. मात्र या दोघांनाही भाषणाची संधी मिळाली नाही. याबाबतच्या वृत्तानंतर 'कळू देत लोकांना, हे खच्चीकरण कोण करतेय ते' असा संताप व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शिंदेंनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे समजते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.