‘१०० दिवस कृती आराखडा’अंतर्गत मौल्यवान मुद्देमाल फिर्यादीला केला परत
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचा उपक्रम
सांगली : खरा पंचनामा
‘१०० दिवस कृती आराखडा’अंतर्गत चोरीला गेलेला दोन लाखांचा मौल्यवान मुद्देमाल फिर्यादीला परत करण्यात आला. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याने विशेष मोहिम राबवून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
शासकीय कार्यालयातील कामकाजाचा दर्जा वृध्दींगत व्हावा, प्रशासकीय कामकाज गतीमान व्हाने तसेच कामकाजात सुसुत्रता यावी यासाठी राज्य शासनाच्यावतीने ‘१०० दिवस कृती आराखडा’ उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस प्रशासनानेही अशी मोहिम सुरु केली आहे. महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे व राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने संयुक्तपणे नुकताच जप्त दारूसाठा नष्ट करण्यात आला. तर आज शुक्रवारी 32 ग्रॅमचे दोन लाखांचे मणिमंगळसूत्र फिर्यादी महिलेला परत करण्यात आले. याशिवाय इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव, सर्जेराव पवार, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, साक्षी पतंगे, सुनिल माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.