Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुन्ह्यांचे आरोपपत्र दोन महिन्यात दाखल करण्यासाठी गृह विभाग प्रयत्नशील : मुख्यमंत्री अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना मदत करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करण्याचा इशारा सांगलीत पोलिस अधीक्षक कार्यालयाचे थाटात उद्‌‌घाटन

गुन्ह्यांचे आरोपपत्र दोन महिन्यात दाखल करण्यासाठी गृह विभाग प्रयत्नशील : मुख्यमंत्री 
अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना मदत करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करण्याचा इशारा 
सांगलीत पोलिस अधीक्षक कार्यालयाचे थाटात उद्‌‌घाटन

सांगली : खरा पंचनामा

प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र दिलेल्या बाईकचा वा करून ते पुरावे गोळा करावेत. आरोपपत्र दाखल करण्यासाठीचा कालावधी कमी करण्यासाठी प्रय सुरू आहेत. पारंपरिक पद्धती वेळखाऊ आहे. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्याचा वेळ कमीत कम ठेवावा यासाठी प्रयत्न करायचे आहेत. राज्यात दोन गुन्ह्यांत ४८ तास आणि २४ तासात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये सात दिवसात गुन्हेगाराला शिक्षा झालेली आहे. आपल्यापुढे सायबर गुन्हेगारीचे आव्हान मोठे आहे. सायबर सिक्युरिटी सेंटर राज्यात सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक १९४५ वर फोन केल्यास तात्काळ कार्यवाही केली जात आहे. आऑनलाईन एफआयआर अंमली पदार्थाबाबत झिरो टॉलरन्सची भूमिका शासनाने घेतली आहे. अंमली पदार्थ विक्री, साठा, वाहतूक - करणाऱ्यांना मदत करणाऱ्या पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला.
सांगलीतील पोलिस अधीक्षक कार्यालय, कडेगाव, आटपाडी पोलिस ठाण्यांच्या इमारती आणि सांगली मुख्यालयातील निवासस्थानांच्या उद्घाटन तसेच पायाभरणी समारंभात फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, पोलिसांच्या निवासस्थानाच्या संदर्भात पन्नास टक्क्यांपर्यंत स्ट्रेंथ असावी असा नियम आहे. परंतु आपल्याकडे वाईट अवस्था होती. आपल्याकडे केवळ तीस टक्के सुद्धा स्ट्रेंथ नव्हती. पोलिसांची निवासस्थाने कमी होती. आता आपण पन्नास हजार निवासस्थाने उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही स्ट्रेंथ पन्नास टक्क्यांपर्यंत जाईल. पोलिस गृहनिर्माण विभागाने निवासस्थानांचे बांधकाम चांगल्या प्रतीचे केले आहे गेल्या दहा वर्षात सातत्याने काम करून ही निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.

सांगली पोलिस अधीक्षक कार्यालयाचे बांधकाम चांगले झाले आहे. तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी या कार्यालयाच्या बांधकामात किती आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे, त्यांनी स्वःता यामध्ये लक्ष घालून बांधकाम केल्याची माहिती दिली आहे. सरकारी काम चांगले होणारच नाही असा एक समज आहे सांगलीची इमारत पाहिल्यानंतर अतिशय चांगले काम झाल्याचे दिसत आहे. १९६० मध्ये राज्यातील बरीच पोलिसांची कार्यालये उभारण्यात आली नव्हती. आताच्या गरजा बदलल्या आहेत. त्यानुसार आता पोलिस विभागाची कार्यालये, निवासस्थाने बांधण्यात येत आहेत. चाळीस हजार पोलिसांची भरत केली आहे. अजूनही करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पोलिस विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात येणार आहेत. देशाने तीन नवे कायदे तयार केले आहेत. या कायद्यामध्ये फॉरेन्सिक आणि टेक्निकल पुरावे घेण्यास सक्तीचे केले आहे. फॉरेन्सिक आणि टेक्निकल पुरावे कधीही फितूर होत नाहीत. त्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा होण्यास बळ मिळणार आहे. सांगलीसारख्या अत्याधुनिक इमारती पोलिसांची कार्यक्षमता वाढवणा-ठरणार आहेत असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही भाषण झाले.

प्रारंभी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. सुरुवातील राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्य गीत पोलिस बॅन्डवर वाजवण्यात आले. यावेळी खासदार विशाल पाटील, धनंजय महाडिक, आमदार जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सत्यजित देशमुख, आ. सुहास बाबर, आ. गोपीचंद पडळकर, आ. अरूण लाड, पोलिस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अर्चना त्यागी, विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) मनोज शर्मा, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, जिल्ह्यातील सर्व पोलिस पोलिस उपअधीक्षक, प्रभारी अधिकारी, नागरिक, मान्यवर उपस्थित होते. अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर-कल्याण यांनी आभार मानले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.