एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड; अहमदाबादवरून लंडन जाणारं उड्डाण रद्द
अहमदाबाद : खरा पंचनामा
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मंगळवारी लंडनसाठी केलं जाणारं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतरची ही दुसरी घटना आहे. एअर इंडियाच्या विमानात सतत तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया फ्लाइट AI-159 या विमानात हा तांत्रिक बिघाड दिसून आला आहे. मंगळवारी हे विमान नुकताच दिल्लीहून अहमदाबाद विमान तळावर दाखल झाले होते. काही तासांतच हे विमान लंडनसाठी उड्डाण भरणार होते. मात्र, त्यापूर्वी झालेल्या तपासणीत तांत्रिक बिघाड दिसून आला आहे. त्यामुळे हे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोमवारीही एअर इंडियाच्या AI-2493 एअरबस A321-211 (VT-PPL) या विमानात तांत्रिक बिघाड दिसून आला होता. त्यामुळे उड्डाणाला विलंब झाला होता. तसेच उड्डाणही रद्द करण्यात आले होते. हे विमान अहमदाबादहून मुंबईहून जाणार जाणार होतं. खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड दिसून येते आहे. त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे.
या सलग तांत्रिक बिघाडांमुळे एअर इंडियाच्या सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्रवाशांना होणारा त्रास आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांमुळे कंपनीवर टीका होत आहे. एअर इंडियाने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.