Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

5 ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी ५ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

5 ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी ५ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई : खरा पंचनामा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगाचा विकास करण्यासाठी पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा प्रथमच निर्णय घेतल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सादर करतील.

राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावी या करिता या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्योतिर्लिंग व त्यांच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त अधिकारी पुढीलप्रमाणे -
श्री क्षेत्र भीमाशंकर (जि. पुणे) - सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा.,
श्री. क्षेत्र घृष्णेश्वर (जि. छत्रपती संभाजीनगर) - उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी.
श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय.
श्री. क्षेत्र औंढा नागनाथ (जि. हिंगोली) वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला.
श्री. क्षेत्र परळी वैजनाथ (जि. बीड) इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.