"महानगरपालिकेत परिवर्तन अटळ, पापाची हंडी आम्ही फोडली"
मुंबई : खरा पंचनामा
"महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागेल. त्या विकासाच्या हंडीतल जे काही लोणी आहे, ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी जांबोरी मैदानातील परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
दहीहंडी मंचावरुन खाली उतरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परिवर्तन दहीहंडीचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "दहीहंडीच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करावा, अशी सर्वांना विनंती आहे" इतकी वर्ष लोणी कुठे जात होतं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कुठे जात होतं, तुम्हाला माहित आहे. तुम्ही माझ्या तोंडातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय. पण जनतेला माहित आहे, लोणी कोणी खाल्लं"
"दहीहंडी, गणेश उत्सवावर बंधन होती, सगळी बंधनं शिंदे साहेबांच सरकार असताना हटवण्यात आली. आता आमचं सरकार आहे, सगळी बंधन हटवण्यात आलेली आहेत. प्रचंड उत्साह आहे. उत्साहात दंहीहंडी साजरी होतेय" असं फडणवीस म्हणाले. "रात्रीपासून पाऊस पडतोय, आजही पावसाचा अंदाज आहे. कितीही पाऊस पडला, तरी गोविंदाच्या उत्साहाचा पाऊस त्यापेक्षा मोठा आहे" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.